पुणे - एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे येथे पार पडलेल्या रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ मध्ये शासकीय शाळांमधील ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विजय मिळवून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. आता हे चौदा विजेते संघ युरोपातील एस्टोनिया येथे होणाऱ्या रोबोटेक्स इंटरनॅशनल २०२५ या जागतिक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवणार आहेत.
या भव्य स्पर्धेत देशभरातील १६ राज्यांतील ५,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, जवळपास निम्मे विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी आणि शासकीय शाळांमधून आले होते. गर्ल्स फायरफायटिंग, लाईन फॉलोअर, आंत्रप्रेन्युअरशिप चॅलेंज, मिनी सुमो आणि फोक रेस अशा विविध श्रेणींमध्ये ५०० हून अधिक रोबोट्सचे सादरीकरण झाले. कृषी, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या वास्तव समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. फलटण, औरंगाबाद, दादरा-नगरहवेली, दमण-दिऊ, लडाख, नवी दिल्ली, देहरादून, पुणे, बेंगळुरू, चेन्नई अशा विविध भागांतील तरुण विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा दाखवत तंत्रज्ञानाला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले.
रोबोटेक्स इंडिया च्या संचालिका पायल राजपाल म्हणाल्या , “या मुलांच्या यशात फक्त कौशल्य नाही, तर दुर्गम गावांमधून जागतिक पातळीवर झेप घेण्याची चिकाटी आणि समानतेचे स्वप्न दडले आहे,”

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने